भारताच्या कलयुगी भीम ची ताकत | प्रोफेसर राममूर्ति नायडू यांचा जीवन परिचय

मित्रांनो, तुम्हाला महाभारतातील भीम ची शक्ती तर माहितच असेल, परंतु कलियुगात आणखी एका भीम चा जन्म झालता हे तुम्हाला माहीत आहे का? त्यांचं नाव होता प्रोफेसर राममूर्ती नायडू, ज्यांचा जन्म एप्रिल १८३५ मध्ये उत्तर आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. आज आपण त्यांच्या जीवनातील आश्चर्यकारक घटनांबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांना इतके प्रचंड बळ कसे मिळाले हे देखील जाणून घेणार आहोत. राममूर्ती नायडू यांचे जीवन एक प्रेरणास्थान आहे, त्यांनी हे सिद्ध केले की समर्पण आणि सरावाने ताकद कोणत्याही मर्यादेपर्यंत मिळवता येते.


Professor Rammurti Nayadu


आश्चर्यकारक पराक्रमी बलशाली प्राध्यापक राममूर्ती नायडू:

प्रोफेसर राममूर्ती नायडू यांचे नाव भारताच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध होते. त्यांच्या अद्भूत कारनाम्यामुळे लोक त्यांना 'कलयुगचा भीम' असे म्हणायचे. त्यांच्या सामर्थ्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत:

  • हत्तीला त्यांच्या छातीवर थांबून ठेवणे: प्रोफेसर राममूर्ती नायडू इतके बलवान होते की ते एका विशाल हत्तीला त्यांच्या छातीवर थांबून ठेऊ शकत होते.
  • 50 जणांनी भरलेले वाहन: प्रोफेसर राममूर्ती नायडू इतके बलवान होते की ते 50 जणांनी भरलेले वाहन त्याच्या शरीरावरून घालवू शकत होते.
  • धावत्या ट्रेनला शरीरावरून घालवणे: प्रोफेसर राममूर्ती नायडू इतके बलवान होते की ते ताशी ७५ मैल वेगाने धावणारी ट्रेन त्यांच्या शरीरावरून जाऊ देत होते.

मित्रांनो हे पराक्रम ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण हे सर्व त्याच्या मेहनतीचे आणि सततच्या सरावाचे फळ होते. सततच्या सरावाने शरीराला सशक्त आणि मजबूत बनवता येते हे त्यांनी सिद्ध केले.


सरावाचे महत्त्व:

प्रोफेसर राममूर्ती नायडू यांचे जीवन आपल्याला शिकवते की सरावाने काहीही शक्य आहे. त्यांच्या जीवनातील बदलांची कहाणी प्रेरणादायी आहे. जीवनात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही.


बालपणातील संघर्ष:

प्रोफेसर राममूर्ती नायडू यांना त्यांच्या बालपणात दम्याची लक्षणे दिसून आली होती. त्यावेळी हा एक गंभीर आजार मानला जात होता, परंतु ते त्या आजाराला बळी पडले नाही. वडिलांच्या सांगण्यावरून त्याने व्यायाम सुरू केला, ज्यामुळे त्याचा आजार बरा झाला.


प्रेरणा:

राममूर्तीजींच्या समोर भीमसेन, हनुमान आणि वीरांच्या मूर्ती होत्या, ज्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली. ते म्हणायचे, "शरीराला सरावानेच मजबूत बनवता येते." वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी आखाड्यात प्रवेश केला आणि कुस्तीपटू होण्याचा उत्साह जागृत केला. त्याची आवड जसजशी वाढत गेली तसतसा त्यांनी व्यायामाचा सराव वाढवला.


भारतीय आणि परदेशी व्यायाम पद्धतींचा अनुभव:

राममूर्ती जी यांनी होरिजेंटल बार, परालल बार, रिंग इत्यादी विदेशी व्यायाम पद्धतींचा सराव केला, परंतु काही काळानंतर त्यांनी त्या पद्धती सोडल्या आणि स्वदेशी व्यायाम करण्यास सुरुवात केली. त्यांना भेटलेल्या सर्व भारतीय कुस्तीपटूंना शारीरिक शक्ती वाढवण्याच्या भारतीय पारंपारिक पद्धतींबद्दल विचारले, परंतु कोणतीही समाधानकारक पद्धत सापडली नाही.


शारीरिक सुधारणेसाठी उपाय:

राममूर्ती जी यांनी संस्कृतमद्धे आयुर्वेदिक ग्रंथांचा अभ्यास केला. गीतासोबतच त्यांनी शुश्रुत संहिता आणि इतर आयुर्वेदिक ग्रंथांचेही वाचन केले. या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्यांना शारीरिक प्रगतीचा उत्तम मार्ग सापडला आणि त्यांनी परदेशी पद्धत सोडून देशी व्यायाम पद्धतीचा अवलंब केला. भीम, हनुमान, अर्जुन इत्यादी पूर्वजांचे वैभव वाढविण्यासाठी ही सर्वोत्तम व्यायाम पद्धत असल्याचे त्यांनी जाहीर केले.


देशी व्यायाम पद्धती:

देसी व्यायाम पद्धतीसाठी कोणत्याही उपकरणांची किंवा साधनांची आवश्यकता नसते. यामध्ये फक्त सरावच सर्व काही आहे, ज्यामुळे शरीराचे स्नायूंना बळकट होतात. अशाप्रकारे प्राध्यापक राममूर्ती नायडू यांनी व्यायाम आणि प्राणायामाचा अभ्यास सुरू केला आणि त्याचा परिणाम असा झाला की वयाच्या 16 व्या वर्षी ते इतके ताकदवान झाले की त्यांनी जर नारळाच्या झाडाला थोडासा डाक्का जरी दिला तर झाडाचे नारळ तुटून पडत होते.


त्याची अद्भुत शक्ती:

त्यांची छाती 45 इंच होती आणि जेव्हा ती वाढवली गेली तेव्हा ती 57 इंच झाली. त्याची उंची 5 फूट 6.5 इंच आणि वजन 2.5 मण होते. त्यांच्या अद्भूत शक्तीमुळे त्यांचे नाव भारतातील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाले. लोक त्यांना कलियुगाचा भीम म्हणून ओळखू लागले.


ब्रह्मचर्य आणि प्राणायामाचे महत्त्व:

ब्रह्मचर्य आणि प्राणायामचे पालन केल्याने शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढते, असे प्राध्यापक राममूर्ती नायडू यांचे मत होते. त्यांनी ब्रह्मचर्यचे पालन केले आणि प्राणायामात ते पारंगत झाले. 44 ते 45 वर्षांचे होईपर्यंत त्यांनी लग्न केले नाही. ब्रह्मचर्य आणि प्राणायामाचे पालन केल्याने भरपूर ताकद मिळवू शकतो असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी भारतीय तरुणांसाठी ब्रह्मचर्य आणि प्राणायामाचा कार्यात्मक प्रचार केला.


प्राणायामाचे महत्त्व:

प्राणायामाच्या सरावाने त्यांची शारीरिक आणि मानसिक ताकद खूप वाढली. प्रोफेसर राममूर्ति नायडू म्हणतात मन, वाणी व शरीर शुद्ध ठेवा, साधे अन्न खा, जीवन साधे जागा, रोज व्यायाम करा, हा या जगात सुखी राहण्याचा मूळ मंत्र आहे.


राममूर्ती जी यांचा मृत्यू:

प्रोफेसर राममूर्ती नायडू यांच्या अद्भूत ताकदीमुळे त्यांना सामान्य पद्धतीने मारणे सोपे नव्हते. इंग्रजांनी कट रचून त्यांची छाती हत्तीच्या पायाने चिरडली. हत्ती ज्या तख्तवर बसवलेला होता तो तख्त कमकुवत होता म्हणून तो तुटून प्रोफेसर राममूर्ती नायडू यांच्या फासळीत घुसला. अशा प्रकारे इंग्रजांनी कट रचून त्यांची हत्या केली.


राममूर्ती जी यांचा संदेश:

प्रोफेसर राममूर्ती नायडू यांचे उद्दिष्ट भारतातील तरुणांचा उद्धार करणे हे होते. देशात तरुणांची अजय सेना तयार झाली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी शोधलेली व्यायाम पद्धत आजही अस्तित्वात आहे आणि अतिशय सोपी आहे.


प्रेरणादायी विचार:

राममूर्ती जी यांचे जीवन एक प्रेरणा आहे. अपयशाला ते कधीही घाबरले नाहीत आणि तरुणांना प्रेरणा दिली की अपयश काय असते ते मला माहित नाही. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 10 वेळा प्रयत्न करत राहा, एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल. ‘करा किंवा मरा, करणार किंवा मरनार’ हा त्यांचा मूळ मंत्र होता.


निष्कर्ष:

मित्रांनो, प्रोफेसर राममूर्ती यांनी शोधलेली व्यायाम पद्धत आजही अस्तित्वात आहे आणि ती अगदी सोपी आहे. तुम्हीही ते सहज करू शकता आणि तुमचे शरीर मजबूत करू शकता. ही व्यायाम पद्धत कोणत्याही उपकरणाशिवाय शरीराला बळकट करण्यास सक्षम आहे.


शेवटचे शब्द:

प्रोफेसर राममूर्ती नायडू यांचे जीवन आणि त्यांची व्यायाम पद्धती आपल्याला शिकवते की योग्य मार्गदर्शन आणि सरावाने काहीही शक्य आहे. कोणत्याही उपकरणाशिवाय देशी व्यायाम पद्धतीने शरीर अत्यंत मजबूत बनवता येते हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचे विस्मयकारक जीवन आणि प्रेरणादायी संदेश स्मरण आणि अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

धन्यवाद...!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने