या 5 भाज्या पुन्हा गरम करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी | Reheating Food In Marathi

Reheating Food In Marathi


मित्रांनो, तुम्ही खूप वेळा ऐकले असेल आणि वाचले असेल की अन्न जास्त प्रमाणात उकळणे किंवा गरम केल्याने त्यातील पौष्टिक घटक नष्ट होतात. पण तुम्हाला माहित आहे का की असे काही खाद्य पदार्थ आहेत जे वारंवार गरम केल्यास त्यांच्या घटकांमध्ये अशी रासायनिक प्रक्रिया होते की ते विषारी बनतात. गरम अन्न खाणे ही एक चांगली सवय आहे, परंतु काही पदार्थ असे आहेत जे एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम केल्यास नुकसानदायक ठरतात.

या पोस्टमध्ये आपण त्या भाज्या आणि खाद्यपदार्थांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या चुकूनही पुन्हा गरम करू नयेत. पुन्हा गरम केल्यावर त्यातील पोषक द्रव्ये तर मरतातच, पण शरीराला फक्त आणि फक्त हानी पोहोचवतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भाज्या पुन्हा गरम केल्या जाऊ शकत नाहीत? किंवा पुन्हा गरम केलेल्या भाज्या खाणे सुरक्षित आहे का?


या 5 भाज्या पुन्हा गरम करण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

बटाटा (Potato)

बटाट्यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात, हा एक खाद्यपदार्थ आहे जो खाल्ल्याने तुम्हाला निरोगी आणि फिट वाटू शकते. पण एकदा शिजवल्यानंतर बटाट्यातील सर्व पौष्टिक घटक पुन्हा गरम केल्यावर नष्ट होतात. पुन्हा गरम केल्यावर ते खाण्यासाठी अयोग्य तर होतेच पण शरीरावर त्याचा घातक परिणामही होतो.


तांदूळ (Rice)

कधीतरी तुम्ही ऐकलं असेल की तांदूळ कच्चे खायला नाही पाहिजे, कारण कच्च्या तांदळात असलेले जंतू आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. हे जंतू भात शिजत असतांना मारले जातात, परंतु भात शिजवल्यानंतर तो तसाच साठवून ठेवल्यास ते जंतू पुन्हा बाहेर येऊ लागतात. त्यामुळे भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास हे जंतू आपल्याला आजारी पडू शकतात.


मशरूम (Mushroom)

मशरूमच्या भाजीला नेहमी ताजी बनवूनच खायला पाहिजेत, मशरूमची बनवलेली भाजी कधीच फ्रिजमध्ये नाही ठेवायला पाहिजेत कारण हि खूप संवेदनशील भाजी आहे आणि लवकर खराब होण्याचा धोका असतो. मशरूममध्ये प्रोटीन जास्त असते, हि भाजी पुन्हा गरम करून खाल्ल्याने तुमचे पोट खराब होऊ शकते, त्यामुळे माशूमची भाजी ताजीच बनवून खायला पाहिजेत. 


पालक (Spinach)

पालक हि सर्व घरात वापरली जाणारी भाजी आहे, पालक भाजीत नायट्रेट नावाचे घटक आढळतात, जे शिजल्यानंतर काही तासांतच कर्करोगजन्य विषारी घटकांमध्ये बदलतात. हे एक प्रकारचे ऍसिड बनते जे जेवणाला खाण्यालायक नाही सोडत. यासाठी चुकून सुद्धा पालक भाजीला पुन्हा गरम करून खाऊ नका.


शालगम (Shal gam)

पालक भाजीप्रमाणेच शालगमची भाजीसुद्धा लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, पण या भाजीला नेहमी नेहमी गरम करून खाल्ल्यास शरीलाला नुकसान होऊ शकते. शालगम मध्ये सुद्धा नायट्रेट घटक आढळतात, जे भाजी शिजल्याच्या काही तासातच नायट्राइट मध्ये बदलतात. यासाठी शालगम भाजीला सुद्धा शिजल्यानंतर लगेच खायला पाहिजेत. 


पुन्हा गरम करण्याचे नुकसान

अन्न नेहमी गरम केल्यानंतरच खाल्ले पाहिजे, परंतु अन्न पुन्हा गरम केल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात. आयुर्वेदात असे म्हटले आहे की अन्न तयार झाल्यानंतर ४८ मिनिटांच्या आत खावे. ४८ मिनिटांनंतर अन्नातील आवश्यक घटक नष्ट होतात. त्यामुळे आपल्याला ही गोष्टही लक्षात ठेवावी लागेल.


इतर महत्वाच्या गोष्टी

पोटाशी संबंधित समस्या: 90% रोग फक्त पोटातुनच होतात आणि बद्धकोष्ठता राहणे हे त्याचे मुख्य कारण आहे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी जेवण नेहमी बारीक चावून खाल्ले पाहिजे आणि जेवणाच्या 1 तासानंतरच पाणी पिले पाहिजेत. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने १०३ रोग होतात, असे आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयात लिहिले आहे.


जेवल्यानंतर आंघोळ

जेवल्यानंतर आंघोळ केल्याने पचनशक्ती कमजोर होते आणि शरीर सुद्धा कमजोर होत जाते. यासाठी जेवण केल्यानंतर आंघोळ नाही करायला पाहिजेत.  


निष्कर्ष

मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला आरोग्यदायी माहिती सांगितली आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे कि पोस्ट स्वतःपुरती मर्यादित ठेवू नये. इतरांनाही शेअर करा जेणे करून त्यांनाही आरोग्याविषयी माहिती मिळू शकेल. 

निरोगी रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने